राजकारण २०१२

परवाचीच गोष्ट, शेजारची  ८ वित शिकणारी  छकू  आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे  , त्यात तुम्ही  मदत करता का?  म्हंटलं कशावर लिहायचा  आहे ग तुला निबंध ? तर म्हणे,   राजकारणावर! मुलांना राजकारण समजावं म्हणून  टीचरने  राजकारणावर एक निबंध लिहून आणायला सांगितलाय  .म्हंटलं ठीक आहे.. सांगतो तुला. आणि छकू बसली समोर कागद पेन घेऊन लिहून घ्यायला.

तिचं लक्ष  बाजूला पडलेला मटा  कडे गेलं , तो उचलला आणि   म्हणाली काका, हे बघा, बाळासाहेब आणि शरद पवारांची युती होणार आहे- तिचं हे वाक्य ऐकून   मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला !   मी म्हंटलं की काहीतरीच काय म्हणतेस-  तर तिने मटा समोर धरला.  ती बातमी मी आधीच वाचलेली होती, त्यात बाळासाहेब म्हणाले होते, की शरद राव माझे फार जवळचे मित्र आहेत -

छकू आता  त्याचं असं आहे, की  ते मित्र आहेत असे जरी म्हणाले  असले तरीही ते इलेक्शन मधे एकमेकांविरुद्ध आपापले कॅंडीडॆट्स उभे करणार आहेत.  अशी कन्फ्युज होऊ नकोस.. थोडं व्यवस्थित सोपं करून तुला मी  राजकारण  म्हणजे  काय ते सांगतो बघ. कुठल्याही राजकीय  पक्षाला  एकट्याच्या बळावर महाराष्ट्राची सत्ता काबिज करता येणे शक्य नाही, ही गोष्ट सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. मग आता इलेक्शन जिंकायला म्हणून हे सगळे पक्ष आपापसात युती करतात आणि इलेक्शन लढतात. ही युती का आणि कशी होते? याचे उत्तर मला तरी माहिती नाही.तरी पण जे काही माहिती आहे ते थोडक्यात सांगतो!

भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आणि  त्याचा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेशी नियमित पणे प्रत्येक निवडणुकीत  युती होत असते. आता असं पहा,  की बाळासाहेब म्हणतात की शरद पवार माझे मित्र , शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे- आणि सोनिया कॉंग्रेसच्या मित्र पक्षातले ! सोनिया कॉंग्रेस ही  शिवसेनेची शत्रू पण राष्ट्रवादीची मित्र!  राष्ट्रवादी कॉंग्रेसची   भाजपा हा शत्रू नंबर एक  . गडकरी हे भाजपाचे अध्यक्ष आहेत, पण वैय्यक्तीक पातळीवर ( म्हणजे काय ते मला विचारू नकोस छकू )       पवारांचे मित्र  आहेत आणि तरीही  ते  राष्ट्रवादीचे शत्रू आहेत – समजलं का तुला?   काय म्हणतेस छकू??     शरद पवार  हे मित्र पक्षाचे  (भाजपाचे )शत्रू या नात्याने बाळासाहेबांचे/गडकरींचे पण शत्रू असायला हवेत? नाही का? एकदम सोप्पं आहे बघ!

अगं छकू  असं  काय करतेस?  शरदराव, बाळासाहेबांचे मित्र   आहेत ,  तर मग त्यांच्याशी युती न करता – शिवसेनेचॊ युती ही  भाजपा बरोबर  का करतात ?  गडकरी हे आपले मित्र आहेत असे बाळासाहेबांनी सांगितल्याचे  कधी आठवत नाही  म्हणतेस – खरंय गं.. मला पण नाही आठवत. दर निवडणूकीच्या वेळेस बाळासाहेब भाजपा नेत्यांबद्दल  पेपर मधे उलटसुलट काहीतरी बातम्या देतात ? एक वर्षापूर्वीची बातमी पहा इथे..  जाऊ दे तुला नाही कळायचं  .

आता असं बघ, मागच्या निवडणुकीत रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या   राष्ट्रवादीच्या बरोबर युती केली होती.अगदी गळ्यात गळे  घालून वावरले ते शरदरावांच्या . याचं कारण असं की तेंव्हा राष्ट्रवादीला वाटले की आठवलेंच्या मुळे दलित मते कॉंग्रेसकडे वळतील. पण दलित मतदार  आता    प्रगल्भ झालाय, रामदास आठवले, किंवा इतर कुठल्याही गटाच्या सांगण्यानुसार मतदान करीत नाही. स्वतःची बुद्धी वापरून मतदान करतात, त्या मुळे मागच्या निवडणुकीत रामदास आठवलेंचा  पार सुपडा साफ झाला. अजिबात मत दिले नाहीत त्यांच्या कॅंडीडॆट्सला. असं म्हणतात, की , तेंव्हा आठवले यांना  संशय आला होता, की शरदरावांनी आपले परममित्र बाळासाहेब यांच्याबरोबर हातमिळवणी करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेला मत द्या असे सांगितले होते. बहुतेक आठवलेंची अपेक्षा असेल की यंदाही तसंच काही तरी होईल आणि आपल्याला राष्ट्रवादीची मते मिळतील- म्हणून या वर्षी शिवसेनेबरोबर युती केली असावी का? किती सोपं आहे बघ राजकारण! कित्ती कित्ती भोळे आहेत ना आठवले?

राज ठाकरे मनसेचे जरी सर्वोसर्वा असले तरीही त्यांचा विश्वास हा  शिवसेना    म्हणजे शत्रूपक्ष नंबर एक चे अध्यक्ष बाळासाहेबांवर आहेच. शरदराव राज ठाकरे यांचे पण मित्र,  पण त्यांच्या मनसे या पक्षाच्या  शत्रू न्ंबर दोनचे अध्यक्ष! राज पण राष्ट्रवादीचे शत्रू. नारायण राव यांनी पण आपला कोंकणात एक “स्वाभिमान” पक्ष काढल्यावर   राज ठाकरेंचे मित्र झाले – बहुतेक शत्रूचा शत्रू तो आपला मित्र- म्हणून  असे असावे.  राणे, बाळासाहेबांचे शत्रू , बाळासाहेब – राज ठाकरेंचे शत्रू, पण राज ठाकरे हे बाळासाहेबांना शत्रू मानत नाहीत, तर केवळ शिवसेनेला शत्रू मानतात , शरद पवार हे राज ठाकरे, नारायण राणे, उद्धव, बाळासाहेब, गड्करी,सोनिया गांधी  या सगळ्यांचे मित्र..- किती सोपं आहे की नाही??.

राज ठाकरेस्वतःचा वेगळा पक्ष असतांना सुद्धा आपल्या शत्रू पक्ष म्हणजे   शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब यांचा जाहीर पणे  मिडीया समोर पोवाडा गात असतात.

मध्यंतरी एकदा राज ठाकरे आपल्या शत्रू पक्ष म्हणजे भाजपाच्या गुजरात मधे जाऊन आल्यावर  आपल्या शत्रूपक्षाच्या मुख्यमंत्र्यांची म्हणजे नरेंद्र मोदी यांची  तोंडफाटेस्तोवर स्तुती केली होती. तेंव्हा उगाच मिडियाने पण पिल्लू सोडले होते की आता बहूतेक शिवसेना , मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार म्हणून. पण तसं नसतं. तुझी मेमरी फारच विक आहे गं छकू, आठवतं का? राज ठाकरेंच्या चार आमदारांना डीबार केले गेले होते. नंतर त्यांना पुन्हा रिइन्स्टेट करवुन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या आमदारांनी स्वतः विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला   सरकार वाचवण्यासाठी मतदान केले होते. :)

उघडपणे एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम उद्धव आणि राज करत असतात. त्या दोघांच्या या अशा  वागण्याने आपल्यासारख्या सामान्य बिनडोक जनतेचे खूप मनोरंजन होते- आणि शरदरावांचा ( त्यांच्या वैय्यक्तिक मित्राचा) फायदा होत असतो. अधूनमधून दादा पण यात आपले हात धुवून घेत असतात.

काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या महालात छगनराव पण गेले होते भेटायला. तेंव्हा अशीही चर्चा होती की ते आता राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत परत जाणार – पण छकू , ती पण एक चाल होती. बाळासाहेबांचा वापर करून घेतला होता , छगनरावांनी, आपले कॉंग्रेसमधले स्थान पक्के करून घ्यायला. समजलं कां तुला? छगनराव गेले मातोश्री वर आणि तिकडे शरदराव एकदम अस्वस्थ झाले होते बघ. आठवते का तुला ते?? असो.

ह्या सगळ्या राजकारण्यांच्या दृष्टीने  राजकारण म्हणजे एक खेळ आहे. या खेळात वेगवेगळे चेहेरे लावून जोकर सारख्या कोलांट उड्या मारून हे राजकारणी आपले मनोरंजन करत असतात  आणि त्याच सोबत खेळ खेळतांना डाव कशा जिंकायचा किंवा विरोधकांचा डाव कसा उलटवायचा  हाच विचार करत असतात.  नेता जितका मोठा- खेळ तितकाच मोठा. खेळ पहातांना आपल्याला उगाच असं  वाटत असतं  की आपली फुकट करमणूक होत आहे, पण तसे नाही- त्या साठी आपण नकळत फार मोठी किंमत मोजत असतो.

बरं छकू , ते जाऊ दे, आता तुला समजलं ना राजकारण म्हणजे काय ?? चल लिही बघू आपला निबंध, आणि जर काही समजलं नाही तर मला विचार मी समजावून सांगेन  बरं का तुला.

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , | 14 प्रतिक्रिया

मैत्रिण..

परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतानाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख तिच्या शरीरातून ओथंबून वहात होतं. केस डाय केलेले ब्राउन कलरचे आणि हात धरलेला एक मुलगा ४ -५ वर्षाचा असेल-कोण असावा तो? तिला पाहिलं आणि , खरंच हीच का ती ? ही शंका आली. वया बरोबरच  झालेले बदल सगळ्या शरीरावरच दिसत होते.असो… आणि तिला पाहिल्यावर सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या.  तिने मला पाहिले आणि  हसून  इकडे ये म्हणून इशारा केला.  हा नातू बरं का.. माझ्या मोठ्या मुलीचा  मुलगा. घरी नक्की ये रे.. नवऱ्याशी ओळख करून देते बघ तुझी.. पण मी मात्र कामाच्या घाईत असल्याने दोन मिनिट बोलून आणि नंतर  पुन्हा सावकाश भेटायचं प्रॉमिस  करून निरोप घेतला. एक जूनी मैत्रीण..  पण खरंच ती मैत्रिण होती का? हा  प्रशन मनात घोळवत कामाला लागलो.

मैत्रिण हे  हेडींग  वाचल्यावर तुमच्यातले अर्धे लोकं तरी या पोस्ट मधे काहीतरी मसालेदार वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने वाचणे सुरु करतील- प Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 80 प्रतिक्रिया

सुख कशा मधे आहे?

आज सकाळच्या टाइम्स मधे वाचलं की म्हणे पैशाने सुख मिळते. आता    ही गोष्ट खरी असली  की जर रडायचं असेल तर ते मर्सिडीज च्या स्टेअरिंग वर डॊकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात काय  फायदा?   तर म्हणून  मला वाटतं सुखाची परिभाषा टाइम्स ने अशी केली   असावी.

सुख, समाधान, आणि आनंद या तीन गोष्टीं आणि दुःख ही चौथी गोष्ट!  या गोष्टींच्या आसपास आपलं आयुष्य फिरत असतं. तसं म्हंटलं तर सुख , आनंद आणि समाधान हे तिन्ही शब्द एकसारख्याच अर्थाचे वाटतात – पण तसे नाही. एखाद्या गोष्टी मध्ये सुख जरी   असले तरीही त्यात समाधान असेलच असे नाही.किंवा एखादी आनंद देणारी गोष्ट सुख देईलच असे नाही. सुख आणि आनंद  हा क्षणिक असतो, पण समाधान हे तसे नसते.  असो विषयांतर होतंय.. Continue reading

Posted in सामाजिक | 78 प्रतिक्रिया

भुत..

१ जानेवारी २०१२.. नवीन वर्ष सुरु झालं होतं. वेळ रात्रीची दिड वाजताची. राजाभाऊ आपल्या मित्रांबरोबर ( बायकोच्या शब्दात सांगायचं, तर टॊळभैरवांबरोबर )पार्टी आटपून घरी निघाले होते.त्या भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखालून जातांना एकाएकी एक भूत समोर येऊन उभं राहिलं. राजा भाऊंकडे बघून त्याने भितीदायक चेहेरा केला, पण राजा भाऊंनी मात्र पुर्ण दुर्लक्ष केलं.

भूत आता मात्र चिडलं होतं,त्याने अजून अक्राळविक्राळ चेहेरा केला, बोटाची नखं पाजळली, आणि राजा भाउंचा गळा पकडायला धावला,पण राजा भाऊंच्या वर मात्र काही परिणाम झाला नाही, त्यांनी शांतपणे त्याचे हात झटकले आणि चालायला लागले . आपल्या कुठल्याही पद्धतीचा काही परिणाम होत नाही, हे पाहिल्यावर शेवटी अगदी अजिजीच्या स्वरात त्या Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , | 55 प्रतिक्रिया

लोकं लग्न का करतात?

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं असतं  का? Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 74 प्रतिक्रिया

प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.

गेली ३ वर्ष ब्लॉग वर लिहितो आहे, पण आज सकाळी जेंव्हा नेहेमीप्रमाणे प्रहारची साईट उघड्ली , आणि ब्लॉगार्क मधे काय आहे ते बघावं, तर त्या मधे आज होते ” काय वाटेल ते” चे केलेले परीक्षण! अनपेक्षित  पणे हा लेख दिसल्यावर नक्कीच आनंद झाला.

या पूर्वी पण ब्लॉगार्क मधे ’ काय वाटेल ते’ चा उल्लेख आला होता, पण आज मात्र पुर्ण पान भर विश्लेषण केलेले आहे. Continue reading

Posted in इतर., मराठी | Tagged , , , , , , | 59 प्रतिक्रिया

अब्रू ची किंमत किती आहे हो??

एका स्त्री च्या   अब्रूची किंमत किती असेल हो ?  मग ती  स्त्री श्रीमंत, गरीब , भिकारी अगदी कोणीही असू शकते.किती असेल किंमत?? विचित्र  वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे अब्रू म्हणजे हिंदी सिनेमात  जेंव्हा एखादी हिरोईन “मेरी इज्जत लुट ली जज साब इसी कमिनेने” म्हणते नां ती अब्रू म्हणतोय मी. Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 39 प्रतिक्रिया

नेव्हीचं म्युझियम .

हे काय असेल?

हा चित्रा मधे दाखवलेला ऑरेंज कलरचा बॉल कसला असावा??  मला पण हाच प्रश्न पडला होता पहिल्यांदा हा बॉल पाहिला तेंव्हा.  पण जेंव्हा तो बॉल म्हणजे आपण नेहेमी ज्याच्याबद्दल ऐकतो तो ब्लॅक बॉक्स आहे हे समजल्यावर ह्याचा रंग ऑरेंज असतांना पण याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात बरं??  याचं खरं टेक्निकल नांव म्हणजे फ्लाईट डाटा रेकॉर्डर!विमानाचा अपघात झाल्यावर नेहेमी बातमी मधे Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 32 प्रतिक्रिया

संस्कृती

कालचीच गोष्ट आहे. मालाडच्या मार्केट मधे फिरतांना बऱ्याच ठिकाणी पाट्या दिसत होत्या . घरगुती फराळाचे मिळेल . चकली , चिवडा, करंजी , शंकरपाळे वगैरे सगळे पदार्थ दिवाळिच्या फराळासाठी उपलब्ध आहेत अशा अर्थाच्या पाट्या लागल्या होत्या. पेपर मधे पण सकाळीच बातमी वाचली की पाचशे टन फराळाचे सामान विकल्या गेले , आणि भारताबाहेर रहाणाऱ्यांसाठी कित्येक टन फराळाचे सामान एक्स्पोर्ट पण करण्यात आले. थांबा.. इथे पूर्वी आई कसे सगळे पदार्थ घरी बनवायची, वगैरे गोष्टी लिहीत नाही मी- कारण ते सगळं तुम्हाला ठाऊक आहेच.

माझ्या आजीला माझी प्रत्येक मैत्रिण ही होणारी बायकोच वाटायची. किंवा कुठलीही एखादी चांगली मुलगी दिसली, की तिचं सुरु व्हायचं ” ही छान आहे , मला पसंत आहे रे, तुझा बाबा पण हो म्हणेल- सांग काय विचार आहे तुझा? ” मी तेंव्हा तसं काही नाही गं आजी, Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 49 प्रतिक्रिया

नतमस्तक

दिवाळी म्हंटलं की  फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या  साधारण पणे पंधरा दिवस आधी  एक पत्र येतं, सोबत काही ग्रिटींग कार्ड्स असतात. ते पत्र वाचलं, आणि सहा कोरे ग्रिटींग कार्ड्स पाहिले, की मला उगाच स्वतःचे  धडधाकट शरीर असून सुद्धा अंगात भरलेल्या    आळशी पणाची लाज वाटते. Continue reading

Posted in कला | Tagged , | 49 प्रतिक्रिया