नतमस्तक

दिवाळी म्हंटलं की  फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या  साधारण पणे पंधरा दिवस आधी  एक पत्र येतं, सोबत काही ग्रिटींग कार्ड्स असतात. ते पत्र वाचलं, आणि सहा कोरे ग्रिटींग कार्ड्स पाहिले, की मला उगाच स्वतःचे  धडधाकट शरीर असून सुद्धा अंगात भरलेल्या    आळशी पणाची लाज वाटते. Continue reading

Posted in कला | Tagged , | 49 प्रतिक्रिया

फायर!!!!!

मराठीपरवाचीच गोष्ट आहे.  मुंबई सेंट्रलला कामानिमित्त जाणे झाले होते. तिथे रस्त्याच्या कडेला हा एक बॉक्स दिसत होता . तुटलेल्या अवस्थेत असलेला हा बॉक्स अजूनही चांगल्या स्थितीत दिसतो. कोणे एके काळी अतिशय महत्त्वाची असलेली ही वस्तू आज मात्र एखाद्या निरर्थक वस्तू प्रमाणे पडलेली पाहून खरंच वाईट वाटलं हा बॉक्स आहे फायर अलार्म चा. साधारण पणे १९०० – १९४० च्या सुमारास ह्या फायर अलार्मचा उपयोग केला जायचा. कुठे जवळपास आग लागली की ह्या बॉक्स च्या समोरची काच फोडून इथे असलेले एक हॅंडल फिरवले, की फायर ब्रिगेडच्या ऑफिस मधे घंटी वाजायची आणि पाच मिनिटात इथे आगीचा बंब ( फायर टेंडर) पोहोचायचा. इंग्रजांच्या काळात उभा केलेला तो खांब अजूनही त्यांच्या कार्यतत्पर  व्यवस्थेची साक्ष देतो.

मुंबई चा फोर्ट विभाग हा इंग्लंडच्या सारखा बनवला होता ब्रिटिश लोकांनी. इथेच रहायचं,तर मग स्वतःच्या घरच्या सारख्या सुख सोयी करून का घेऊ   नये म्हणून असेल कदाचित किंवा होमसिक Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 46 प्रतिक्रिया

नो कमबॅक्स……१

असं का व्हावं? माझ्याच बाबतीत असं का व्हावं? आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता? आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं स्थान, या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग?
Continue reading

Posted in साहित्य... | Tagged | 4 प्रतिक्रिया

नो कमबॅक्स….२

दुसरा दिवस उजाडला आणि मी मात्र सकाळपासूनच रात्र कधी होते याची वाट पहात होतो. एकदाची रात्र झाली. साधारण साडे नऊ वाजले होते. मी क्लबच्या बार मधे एका कोपऱ्यात एकटाच बसलो होतो. समोर व्हिस्कीचा ग्लास होता. पहिलाच पेग सुरु होता. समोरुन रश्मी मेहेराला येतांना पाहिले. आज एकटीच होती ती. सरळ चालत माझ्याच टेबलवर येऊन बसली. तिला बघून बार टेंडरने एक ब्लडी मेरीचा ग्लास बनवला आणि तिच्या समोर आणून ठेवला. Continue reading

Posted in Uncategorized | 47 प्रतिक्रिया

मिस यु…

 R I P

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , | 15 प्रतिक्रिया

वर्ल्ड हेरीटेज चर्च.

This slideshow requires JavaScript.

आपल्या भारता मधे असलेल्या २८ हेरीटेज पैकी एक सगळ्यात मह्त्त्वाची  हेरीटेज वास्तु गोव्याला पण आहे-ती म्हणजे सेंट झेवियर्स चर्च. ह्या चर्च कडे एक हेरीटेज वास्तू म्हणून पाहिले जात नाही , कारण या चर्च मधे ठेवलेली  सेंट झेवियर्सची ममी  . तिथे पोहोचलो, की केंव्हा एकदा आत जाऊन त्या झेवियर्सच्या ममी ला पहातो असे लोकांना  होते, आणि मग १५ व्या शतकात बांधलेल्या त्या सुंदर इमारतीच्या बांधकामा कडे  दुर्लक्ष होते.

पोर्तुगीज भारतामधे जेंव्हा आले, तेंव्हा त्यांचा मूळ उद्देश हा धर्मप्रसार करणे इतकाच होता. इथे येऊन सरकार विरोधी असलेल्या किंवा धर्मांतरासाठी नकार देणाऱ्या  हिंदूंच्या संपत्ती सरकार जमा करणे , तसेच जर एखादा हिंदू मागे वारस न ठेवता मेला तर त्याची संपत्ती सरकार जमा करणे आणि  त्या पैशातून चर्च बांधणे हा एककलमी कार्यक्रम घेऊन ते इथे आले होते. एखाद्या हिंदू किंवा मुसलमान माणसाने   जर ख्रिश्चन धर्म स्विकारला, तर त्याला अभय देणे , आणि सवलती देणे ही तर जुनी स्ट्रॅटेजी होती.    कसेही करून ख्रिश्चन धर्म इथे रुजवाय्चा होता.या चर्च साठी किंवा गोव्यातल्या कुठल्याही चर्च साठी पैसा हा हिंदूंचा वापरला गेलेला आहे. अर्थात ही आहे १४ व्या १५व्या शतकातली गोष्ट! Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 13 प्रतिक्रिया

मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का?

काय वाटेल ते, mahendra kulkarni, kayvatelte.comमाणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का वृद्धांना? आपण रहातो कसे तर कंजूष माणसासारखे.. नेहेमीच हा विचार मनात असतो, की मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, आजारपण, म्हातारपण या साठी पैसा गाठीशी असायला हवा, म्हणून आज काटकसर करून पैसा जमा करून ठेवण्याकडे आपला कल असतो.

आपलं वृद्धावस्थेतलं जीवन सोपं होईल या Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 22 प्रतिक्रिया

फिअर इज द मोटीव्हेटर..१

वय वर्षे फक्त २९! हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत? असं काय वाईट केलं होतं की आज हा दिवस पहावा लागतोय आपल्याला?

सिगरेट खरं तर त्याने सोडली होती, चार वर्षापूर्वीच. पण आज मात्र पुन्हा सिगरेट ओढायची इच्छा झाली. कशाला उगाच सोडायची सिगरेट??शेजारच्या सिगरेटच्या टपरीकडे नजर गेली, आणि त्याने एक पॅकेट  ’विल्स नेव्ही कट’ घेतली. सिगरेटचं पाकिटं Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , | 9 प्रतिक्रिया

फिअर इज द मोटीव्हेटर.. २

रात्री बराच वेळ मरीन लाइन्सच्या कठड्यावर एकटाच बसला होता . दिवसभर आपण काय केलं याचा विचार करत. काय वाईट केलं आपण? काही नाही- योग्यच केलंय. असं काही केल्याशिवाय कोणी घाबरणार आहे का? तो पहिला टॅक्सीवाला नाही, कसा म्हणाला, की जाओ पुलीस को बुलाओ…बरोबर केलं आपण.नकळत आईची आठवण झाली , डोळे भरून आले. तिला समजलं की आपल्याला एच आय व्ही आहे तर काय वाटेल तिला? हे रोगाचे जे संक्रमण झाले आहे, ते दिलेल्या रक्तातून ह्यावर विश्वास ठेवेल ती? तिथून उठला आणि चालत निघाला. टॅक्सी थांबवली, आणि घरी निघाला.

घरी जाण्यापूर्वी एका हॉटेल मधे जेऊन घेतलं, आणि घरी पोहोचल्यावर टीव्ही सुरु केला. सगळीकडे तो ’ पोस्ट ईट’ किलर ची बातमी सुरु होती. कोणालाच काही सांगता येत नव्हतं . पण काही लोकं मात्र उगाच टिव्हीवर यायचं म्हणून पोलिसांना आपण त्या पोस्ट इट किलरला पाहिल्याचे सांगत होते. काही लोकं तो सहा फुट उंच आणि सावळा आहे म्हणत होते, तर काही चांगला गोरा पान आहे हो, पण अंमळ बुटकाच.. Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , | 68 प्रतिक्रिया

१ सप्टेंबर १९४२..

जर तुम्हाला आज सांगितलं , की भारताच्या एका भागाला स्वातंत्र्य  फार पूर्वी  मिळालं होतं, आणि त्या स्वतंत्र हिंदुस्थान देशाला जवळपास सात देशांनी मान्यता दिली होती – ज्या मधे चीन,इटली आणि जर्मनी हे देश पण होते तर तुम्हाला खरं वाटेल??अर्थात नाही!!

कारण काही नेत्यांना , की ज्यांचा अहिंसेच्या चळवळीवर अजिबात विश्वास नव्हता, आणि जे म्हणत होते, की आम्हाला स्वातंत्र्य देणारे हे ब्रिटीश कोण? आम्ही तर स्वतंत्र आहोतच!  त्यांची आठवण आपण सगळे पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. महापुरुषांच्या जिवनातला एखादा प्रसंग, किंवा एखादं वाक्य वेळोवेळी शाळेमधल्या त्या नेत्याच्या जयंती किंवा पुण्यतिथीला आळवतच आपण मोठे होतो. केवळ शाळेत शिकायचे म्हणून या नेत्यांची  चरित्रं वाचणारे आपण- केवळ काही इतिहास महापुरुषां पुरताच आपला अभ्यास मर्यादित ठेवतो. आजही “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, ” हे वाक्य किंवा ” मी  शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून टरफलं उचलणार नाही ” असे वाक्य आठवते लोकमान्य टिळक आठवले म्हणजे.लोकमान्य टीळकांनी एवढंच काम केलं का? असो.. Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 43 प्रतिक्रिया