पण सांग ना, जर मी गेले, तर तु पुन्हा लग्न करशील?
काहीतरी वेड्यासारखी बोलू नकोस. आधी लवकर बरी हो, नंतर बोलू.
पण सांग ना .. करशिल ना पुन्हा लग्न? खरंच सांग. थर्ड स्टेज ओव्हरीज मॅलिग्नंट कॅन्सरची पेशंट,किती दिवस तग धरणार अजुन? आज ना उद्या संपणारच सगळं.
नाही गं, तु बरी होशिल लवकरच. डॉक्टरांनी सांगितलंय कालच.
तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं. अरे मला पण समजतं, मॅलिग्नंट कॅन्सर म्हणजे काय . आणि डोळे बंद करुन पडुन राहिली.
तो विचार करत बसला होता. लग्नाला उणीपुरी २० वर्ष झाली .एकच मुलगा, तो पण यंदा १२वी ला. आज पर्यंतचं सगळं आयुष्य कसं अगदी चित्रातल्या सारखं रेखीव जात होतं. सुंदर बायको, हुशार अभ्यासु मुलगा, चांगली नोकरी. सकाळी उठल्याबरोबर बेड टी पासुन तर ऑफिसला जातांना, कपडे, रुमाल , पाकिट , टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी तयार असायच्या. एकही गोष्ट कधी शोधावी लागली नाही. थोडक्यात तिच्यावर घराची सगळी जबाबदारी टाकुन तो निर्धास्त होता. अगदी मुलाची शाळेची ऍडमिशन, वेळोवेळी होणारी पिटीएम ( पॅरेंट टीचर मिटींग) नेहेमी तीच अटेंड करायची. त्याची शाळा, अभ्यास, खेळणं या कडे तिचे कायम लक्ष असायचे. आज त्याला जाणवलं, आपल्या आयुष्यात तिचं स्थान अगदी ध्रुवा सारखं अढळ.
पण एक दिवस तिचे पोट दुखतं होते, आणि ब्लिडींग थांबत नव्हते म्हणुन डॉक्टरकडे तिला नेले. आणि त्या दिवसापासुन आयुष्याला एक वेगळंच वळण लागल. निरनिराळ्या टेस्ट्स केल्यावर डॉक्टरांनी डिक्लिअर केलं की कॅन्सर आहे, आणि तो पण मॅलिग्नंट! केमो ने थोडा आराम पडेल, पण पुर्ण बरे होणार नाही. तिला काही सांगितलं नाही, पण सुशिक्षित बायको असल्याचा तोटा म्हणजे तिला सगळं समजलं होतं.
तिने पुन्हा डोळे उघडले, तो समोरच तिच्या पलंगाशेजारी एका खुर्चीवर बसला होता, विचार करत होता कसला तरी. तिने पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला- मी गेल्यावर तु लग्न करशील ?
तिला काय उत्तर द्यावे हा विचार करत होता तो. खरं तर आता ह्या प्रश्नामुळे चिड येणं सुरु झालं होतं. अरे काय ही प्रश्न विचारते? काय बोलावं?
ती म्हणाली, मला ठाऊक आहे, तुझं काही “त्या” शिवाय होत नाही, तु नक्की दुसरं लग्नं करणार.
अगं पण तसं नाही,त्याने तिचा हात हातात धरला होता, माझं “त्या” शिवाय नाही, तर तुझ्या शिवाय होत नाही. तुझ्या शिवाय तर कोणाचा विचारही करु शकत नाही मी या आयुष्यात. तिने समाधानाने डोळे मिटले.
आणि दोनच दिवसांनी तिने प्राण सोडले.
आयुष्यात एकटेपण म्हणजे काय हे आता त्याच्या लक्षात आलं होतं. अंगावर उपरणं घेऊन तो स्मशानात उभा होता. समोर पिंड ठेवले होते.कावळा अगदी पिंडाभोवती उडत होता, पण चोच काही लावत नव्हता. दोन तास झाले.
त्याने ह्या दोन तासात तिची कुठली इच्छा पुर्ण व्हायची राहीली असेल ह्याचा विचार करत होता. मी पुन्हा लग्न करणार नाही, मुलाकडे नीट लक्ष देईन. असं म्हंटल्यावर तरी कावळा शिवेल असे वाटले होते पण नाही.
शेवटी त तो म्हणाला, जन्मोजन्मी माझे तुझ्यासोबतच लग्न व्हावे अशी माझी इच्छा आहे, मग तु अगदी अशी अर्ध्यातुन संसार सोडुन गेलीस तरीही माझी हरकत नाही.
आणि तो कावळा, जो पिंडासमोर बसला होता, त्याने त्या पिंडावर चोच मारुली आणि आजुबाजुचे इतरही कावळे त्या पिंडावर तुटून पडले..
Khup Sunder kaka, me mulgi kashi patau jara sagana
खूप चान लिहिले आहेत सर. पण हल्ली खूप कमी लिहिता का आधीपेक्षा ??? का बर ??
hi mahendra i just want to talk with you